येशूने म्हटले की, त्यांना बांधलेली एक गाढवी आणि तिचे शिंगरू आढळतील [२१:२].
संदेष्ट्याने असे सांगितले होते की, राजा हा गाढवावर, आणि गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे [२१:-४-५].
लोकसमुदायाने त्यांचे बाह्य कपडे आणि झाडांच्या डहाळ्या रस्त्यावर पसरविल्या [२१:८].
लोकांनी गजर केला की, "दाविदाच्या पुत्राला होसांना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित, उर्ध्वलोकी होसांना!" [२१:९].
मंदिरांत जे क्रयविक्रय करीत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालवून दिले, सराफाचे चौरंग आणि कबूतरे विकणा-यांच्या बैठकी पालथ्या केल्या [२१:१२].
येशूने म्हटले की व्यापा-यांनी देवाच्या मंदिराला लुटारूंची गुहा केले आहे [२१:१३].
येशूने संदेष्ट्याचे शब्द उद्धृत केले की बाळकें आणि तान्ही मुलें ह्यांच्या मुखांतून देवाने स्तुति पूर्ण करविली [२१:१५-१६].
त्या अंजिराच्या झाडावर फळ नव्हते म्हणून येशूने त्या झाडाला सुकवून टाकले [२१:१८-१९].
येशूने त्याच्या शिष्यांना शिकविले की ते विश्वास धरून प्रार्थनेमध्ये जे कांही मागतील ते त्यांना प्राप्त होईल [२१:२०-२१].
येशूने ह्या गोष्टीं कोणत्या अधिकाराने केल्या हे मुख्य याजक आणि वडिलांना जाणू घ्यावयाची इच्छा होती [२१:२३].
येशूने त्यांना विचारले की त्यांना काय वाटते की योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गातून किंवा माणसापासून होता[२१:२५]. प? योहानाचा बाप्तिस्मा हा स्वर्गातून होता हे उत्तर मुख्य याजक व शास्त्री लोकांनी का दिले नाही?
त्यांना हे ठाऊक होते की येशू त्यांना विचारेल की मग त्यांनी योहानावर विश्वास का ठेवला नाही [२१:२५].
कारण लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली कारण लोक योह्नाला संदेष्टा मानीत होते [२१:२६].
पहिला मुलगा ज्याने तो जाऊन काम करणार नाही असे म्हटले होते, परंतु नंतर त्याने त्याचा विचार बदलला आणि तो गेला [२१:२८-३१].
येशूने म्हटले की ते देवाच्या राज्यांत प्रवेश करतात कारण त्यांनी योहानावर विश्वास ठेवला, परंतु मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांनी योहानावर विश्वास ठेवला नाही [२१:३१-३२].
माळ्यांनी त्या दासांना ठोक दिला, कोणाला जिवे मारले, व कोणाला धोंडमार केला [२१:३५-३६].
शेवटी धन्याने त्याच्या स्वत:च्या पुत्राला पाठविले [२१:३७].
माळ्यांनी त्याच्या पुत्राला जिवे मारले [२१:३८-३९].
धन्याने पहिल्या माळ्यांचा नाश करून जे त्याला हंगामी पीक देतील अशा दुस-या माळ्यांना ठेवावे असे लोकांनी म्हटले [२१:४०-४१].
बांधणा-यांनी जो दगड नापसंत केला होता तोच कोनशिला झाला [२१:४२].
येशूने सांगितले की देवाचे राज्य मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांच्याकडून काढून घेतले जाईल व जे राष्ट्र त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल [२१:४३].
त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली कारण लोक येशूला संदेष्टा मानीत होते [२१:४६].