कांही लोकांनी आमंत्रणाचा गंभीरपणे विचार केला नाही व ते त्यांच्या कामाधंद्याला गेले, तर दुस-यांनी राजाच्या दासांना धरून जिवे मारले [२२:२-६].
राजाने आपले सैनिक पाठवून त्यांच्या नाश केला व त्यांचे नगर जाळून टाळके [२२:७].
राजाच्या दास जितक्या वाईट आणि चांगल्या लोकांना घेऊन येऊ शकले तितक्यांना त्याने आमंत्रित केले [२२:९-१०.
राजाने त्याचे हातपाय बांधून त्याला बाहेरील अंधारांत टाकून दिले [२२:११-१३].
परूशी लोकांनी येशूला बोलण्यांत कसे पकडावे ह्याविषयी मसलत केली [२२:१५].
कैसरला कर देणे योग्य आहे किंवा नाही असे त्यांनी येशूला विचारले [२२:१७].
येशूने म्हटले कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा [२२:२१].
पुनरुत्थान नाही असा सदूकी लोकांचा विश्वास होता [२२:२३].
त्या स्त्रीला सात पती होते [२२:२४-२७].
येशूने म्हटले की सदूकी लोकांना शास्त्र आणि देवाचे सामर्थ्य ह्याबद्दल माहित नव्हते [२२:२९].
पुंरुत्थानानंतर ते लग्न करून घेत नाहीत असे येशूने म्हटले [२२:३०].
येशूने त्या शास्ताभागाचा उल्लेख केला जेथे देवा असे म्हणतो की तो अब्राहामाचा, इसहाकाचा, आणि याकोबाचा देव - म्हणजे जिवंतांचा देव आहे [२२:३२].
नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत मोठी आहे असे वकिलाने येशूला विचारले [२२:३६].
तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंत:करणाने, पूर्ण जिवाने, व पूर्ण मनाने प्रीति कर आणि तू आपल्या शेजा-यावर स्वत:सारखी प्रीति कर ह्या सर्वांत मोठ्या दोन आज्ञा आहेत असे येशूने सांगितले [२२:३९].
ख्रिस्त कोणाचा पुत्र आहे असे येशूने विचारले [२२:४२].
ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे असे परूशी लोकांनी उत्तर दिले [२२:४२].
तर मग दावीद त्याच्या पुत्राला, ख्रिस्ताला, प्रभू कसे म्हटला असे येशूने विचारले [२२:४३-४५].
परूशी लोक येशूला एका शब्दानेहि उत्तर देऊ शकले नव्हते [२२:४६].